Shetkari Marathi Nibandh Best Nibandh In 100+ Words

SHETKARI MARATHI NIBANDH 

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे | शेतकऱ्याचे भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे | शेतकरी आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो | या धरतीला सुजलाम सुफलाम बनवतो | शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो म्हणून आपल्याला अन्न मिळते थंडी , ऊन व पाऊस हे सगळं सहन करून शेतकरी आपल्यासाठी मेहनत करत असतो |

 

शेतकरी सकाळी लवकर उठतो, आपले बैल आणि इतर सर्व सामान घेऊन शेताकडे निघतो | तासनतास तो शेतात काम करतो आणि कठीण परिश्रम करतो | पण एवढ्या परिश्रमानंतर देखील त्याला जास्त लाभ होत नाही | बरेच शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढतात तर काही शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्माहत्या करतात | शेतीत जास्त नफा नसल्या मुळे अनेक शेतकरी शेती सोडून इतर व्यवसाय करण्यासाठी शहरात जातात |

 

शेतकरांच्या या समस्यांकडे सरकारने दखल दिली पाहिजे व शेतकरांना मदत केली पाहिजे | लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ चा नारा दिला होता | त्यांनी म्हटले होते की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे म्हणून आज त्याना सरकार द्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी |

 

वाढत्या शहरीकरणामुळे भारतीय शेती संस्कृतीचे सार थोडेसे लोप पावत हे | या काँक्रीट जगात इमारतींनी शेतांची जगा वेगाने घेतली आहे | असेच होत राहिल्यास भारतीय अर्थव्यवस्था पत्त्याच्या घरासारखी कोसळेल |

                                                                                                                        —-SRUSHTI SHELAR

                                                                                                            (St. Josephs, Navi Mumbai)

Leave a Comment